टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ‘हा’ खेळाडू असणार टीम इंडियाचा कर्णधार…; सौरव गांगुली स्पष्टच बोलला

WhatsApp Group

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आणि या मालिकेत संघाने 1-1 अशी बरोबरी साधली. दिग्गज महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्मा हा दुसरा कर्णधार बनला, ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका अनिर्णित ठेवली. आता कसोटी मालिकेनंतर सर्वांच्या नजरा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेकडे लागल्या आहेत. निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तान विरुद्धची मालिका ही टी-20 विश्वचषक 2024 पूर्वी भारतीय संघाची शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आहे. आता बीसीसीआयचे माजी प्रमुख सौरव गांगुली यांनी सांगितले आहे की कोणत्या खेळाडूने टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करावे?

सौरव गांगुली म्हणाला की, रोहित शर्माने टी-20 विश्वचषकाचे नेतृत्व नक्कीच करावे. विराट कोहलीही संघात असावा. विराट हा महान खेळाडू आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्धचा उपांत्य सामना हा या दोन्ही खेळाडूंसाठी शेवटचा टी-20 सामना होता. आता 14 महिन्यांनंतर हे दोन्ही खेळाडू टी-20 सामना खेळणार आहेत.

IND Vs AFG: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटचे पुनरागमन

रोहित-विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही गेल्या दशकात टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमधील महत्त्वाचे दुवे आहेत. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले. कोहलीने टी- 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4008 धावा केल्या आहेत आणि तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. रोहित 3853 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर टी-20 इंटरनॅशनलमध्येही चार शतके आहेत.

सकाळी गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे आजार दूर राहतील

दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील यशस्वी जैस्वालच्या कामगिरीने सौरव गांगुली प्रभावित झाला असून, युवा सलामीवीर फलंदाजाला भविष्यात भरपूर संधी मिळतील, असे तो म्हणाला. 22 वर्षीय फलंदाज सेंच्युरियन आणि केपटाऊन कसोटीच्या चार डावात केवळ 50 धावा करू शकला. गांगुली म्हणाला की, दुसऱ्या कसोटीत तो चांगला खेळला, ही त्याच्या कारकिर्दीची फक्त सुरुवात आहे. त्याला भरपूर संधी मिळतील. सामना हरल्यानंतर लोक खूप बोलतात, पण भारत एक मजबूत संघ आहे. भारताने एकदिवसीय मालिका जिंकली तर कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका अनिर्णित ठेवली.