IND Vs AFG: ‘डबल धमाल’, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय! हिटमॅन रोहित शर्मा चमकला..!

WhatsApp Group

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात एकूण दोन सुपर ओव्हर खेळल्या गेल्या. या विजयासह भारतीय संघाने अफगाणिस्तानला क्लीन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला, तर रिंकू सिंगनेही दमदार खेळी केली. ही मालिका जिंकण्यासोबतच टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने अवघ्या 22 धावांवर 4 विकेट गमावल्या. विराट कोहली आणि संजू सॅमसनसारखे स्टार फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. त्यानंतर तिथून रोहित शर्मा आणि रिंकू सिंगने डावाची धुरा सांभाळली आणि दोन्ही खेळाडूंनी 5व्या विकेटसाठी नाबाद 190 धावांची भागीदारी केली. यासह भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध 4 विकेट गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 212 धावा केल्या. अखेर टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकला.

हेही वाचा – IND vs AFG: रोहितच नंबर 1! बनला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये निर्णय घेण्यात आला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सुपर ओव्हरमध्ये एक विकेट गमावून 16 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानेही केवळ 16 धावा केल्या आणि पुन्हा एकदा सामना अनिर्णित राहिला. यादरम्यान रोहित शर्माने 4 चेंडूत 13 धावा केल्या. यानंतर पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. जिथे भारताने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला विजयासाठी 12 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ एक धाव करू शकला आणि सुपर ओव्हरमध्ये त्यांनी दोन्ही विकेट गमावल्या. सुपर ओव्हरमध्ये टीमच्या फक्त दोन विकेट्स असतात. यामुळे टीम इंडियाने हा रोमांचक सामना जिंकला.