10 आमदार निवडून आले तरी मुख्यमंत्र्यांचा गणपती करणार – बच्चू कडू

WhatsApp Group

तिसरी आघाडी स्थापन केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. त्यांनी आता थेट महायुती आणि महाविकास आघाडीलाच इशारे द्यायला 5सुरूवात केलीय. “288 आमदार नाही, फक्त 10 जरी आमदार निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराच बच्चू कडू यांनी आता दिलाय. त्यांच्या विधानामुळे आता शिंदे गटाकडून टीका केली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूक काही सोपी नाही. प्रचंड पैसा वाटला जाणार आहे. पण जेव्हा सर्वसामान्य माणूस पेटून उठतो तेव्हा माझ्यासारखे चार आमदार निर्माण होतात, त्यामुळे आपल्याला विधानसभेत सामान्य जनतेचा आवाज पोहोचवायचा आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.