
भारतीय संघात यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडलेला वृद्धिमान साहा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आला आहे. साहाचा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालशी (सीएबी) वाद झाला सुरू आहे. त्यामुळे त्याने बंगालचा संघ सोडण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. सध्या तो ‘प्लेयर कम गाईड’च्या भूमिकेसाठी त्रिपुराशी चर्चा करत आहे.
एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “त्याला त्रिपुरासाठी खेळाडू आणि मार्गदर्शक अशा दोन्ही जबाबदाऱ्या घेण्याची इच्छा आहे. त्रिपुरामधील सर्वोच्च क्रिकेट परिषदेतील काही सदस्यांशी याबाबत त्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “वृद्धिमान साहाला सीएबीकडून आणि नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ना-हरकत पत्र प्राप्त करावे लागेल. त्यानंतरच बाकीची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. याबाबत त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघामधून वगळल्यानंतर साहाने रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासही नकार दिला होता. आयपीएलमध्ये मात्र, त्याने गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात साहाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२००७ मध्ये बंगालकडून पदार्पण करणाऱ्या साहाने १२२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. प्रदीर्घकाळानंतर त्याने बंगालचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.