15 वर्षांचा दुष्काळ संपवून भारत T20 World Cup जिंकेल का? जाणून घ्या सुनील गावस्कर यांचे उत्तर

WhatsApp Group

ICC T20 World CUP: दिग्गज माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी गावस्कर यांच्या मते रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ विश्वचषक जिंकेल. त्याचवेळी मोहम्मद शमी संघात असावा की नसावा याबाबत जे काही सुरू आहे ते आता थांबले पाहिजे, असेही ते म्हणाले.  टीम इंडियाने 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला T20 विश्वचषक जिंकला होता, त्यानंतर भारताने 2014 मध्ये एकदा अंतिम फेरी गाठली होती जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषक संघाची निवड केल्यानंतर, क्रिकेट पंडित आणि माजी दिग्गज संघाचे विश्लेषण करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, रोहित अँड कंपनीला नशिबाने थोडी साथ दिली तर ते भारताच्या दुसऱ्या T20 विजेतेपदाला गवसणी घालू शकतात.

गावस्कर यांना विचारण्यात आले की, ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर मोहम्मद शमीला संघात न घेतल्याबद्दल भारताला पश्चाताप होईल का? प्रत्युत्तरात गावस्कर यांनी कोणत्याही वादात पडण्यास नकार दिला. ते म्हणाले, “एकदा संघ निवडला की तो आपला भारतीय संघ आहे आणि आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आम्ही निवड आणि वगळण्यावर शंका घेऊ नये कारण यामुळे काही खेळाडूंचे मनोधैर्य खचू शकते.

T20 विश्वचषकासाठी असा आहे भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह.