
विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल. मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी नव्या राजधानीच्या नावाची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, राज्याची राजधानी विशाखापट्टणम येथे हलवली जाईल. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, ते त्यांचे कार्यालय विशाखापट्टणमला हलवणार आहेत. 23 एप्रिल 2015 रोजी आंध्र सरकारने अमरावतीला आपली राजधानी म्हणून घोषित केले. त्यानंतर 2020 मध्ये राज्याने तीन राजधानी शहरे बांधण्याची योजना आखली. ज्यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूलचा समावेश होता.
राज्य सरकारने विशाखापट्टणम (कार्यकारी राजधानी), अमरावती (विधानिक राजधानी) आणि कुरनूल (न्यायिक राजधानी) या तीन राजधान्या करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रेड्डी म्हणाले की, राज्य सरकार 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करत आहे. या बैठकीत उद्योग क्षेत्रातील लोकांनी सहभागी होऊन राज्यात गुंतवणूक करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
Vishakhapatnam to be new Andhra Pradesh capital: CM Jagan Reddy
Read @ANI Story | https://t.co/etRGDgWCCa#AndhraPradesh #Vishakhapatnam #JaganMohanReddy #AndhraPradeshCapital pic.twitter.com/IaTnoWwZgp
— ANI Digital (@ani_digital) January 31, 2023