![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
गायकवाड यांनी एका महिला रस्ता ओलांडण्यासाठी धडपडतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर इतर पुरुष तिला मदत करताना दिसत आहेत. पावसामुळे अनेक गाड्या अडकल्याचेही येथे पहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही.
पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी… pic.twitter.com/CXaJS3Ndmc
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 24, 2023