
शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार पडलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरू दिवसें दिवस वाढतच आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध भाजपा असाही सामना रंगला आहे.
आरोप-प्रत्यारोपां करताना अनेकदा खालच्या पातळीवर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात काही राजकीय नेतेमंडळींनी याआधीही मत व्यक्त केलं असताना आता शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्वीट करून आपली भूमिका मांडली आहे. हेही वाचा – मोठी बातमी! शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, त्यातच शिंदे गटाचा महत्त्वाचा हिस्सा असलेल्या उदय सामंत यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केल्याने त्यांचा रोख नेमका कोणावर आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो, राजकारणामध्ये टीका टिपण्णी होत असते..परंतु टीका करताना आपण जी पातळी गाठतोय ती योग्य आहे असं वाटत नाही..महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे..भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती.
— Uday Samant (@samant_uday) October 19, 2022
काय म्हणाले उदय सामंत?
महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो, राजकारणामध्ये टीका टिपण्णी होत असते..परंतु टीका करताना आपण जी पातळी गाठतोय ती योग्य आहे असं वाटत नाही..महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे..भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माझी नम्र विनंती. असं उदय सामंत म्हणाले आहेत.