कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षीसासाठी पुढील वर्षापासून १ कोटी रुपयांचा निधी देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

WhatsApp Group

सांगली – आंतरराष्ट्रीयराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध खेळाप्रमाणे राज्यातील नवीन खेळाडूंना संधी मिळावी त्यासाठी शासनाकडून राज्यस्तरावर चार मोठ्या स्पर्धा भरविण्यात येतात. त्यामध्ये कुस्तीकबड्डीखो-खो व व्हॉलीबॉल यांचा समावेश आहे. या प्रत्येक स्पर्धेसाठी 75 लाख इतका निधी बक्षिसासाठी देण्यात येतो तो निधी पुढील वर्षापासून 1 कोटी रुपयांपर्यंत करण्यात येईल.

चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्यात विभाग स्तरावरील क्रिडा संकुलासाठी 50 कोटीजिल्हास्तरावरील क्रिडा संकुलासाठी 25 कोटीतालुका क्रिडा संकुलासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे खेळाडू घडतील,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू क्रिडानगरी पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या 24व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटीलगृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटीलसांगलीमिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशीआमदार मानसिंगराव नाईकआशियाई व्हॉलीबॉल फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष रामअवतार जाखडप्रांताधिकारी संपत खिलारीजिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारेमहाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटीलपी. आर. पाटीलभारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव अकी चौधरीज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडु महमंद मुल्ला आदी उपस्थित होते.

 राज्यातील खेळाडूचे हित जपण्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूना वर्ग 1 व वर्ग 2 च्या नोकऱ्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार सरकारकडून देण्यात येत आहेत. असे सांगूनउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेविविध खेळामध्ये प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांनी योग्य मार्गदर्शन व पाठबळ देणे आवश्यक आहे.

खेळामध्ये लक्ष घातल्यानंतर शैक्षिणक नुकसान होईल या भावनेतून खेळाडुंची अडवणूक करु नये. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये  कोणत्या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्यानूसार त्याला प्रशिक्षण द्यावेशासन खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच पण त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना पाठबळ द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेगेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध स्पर्धा राज्यामध्ये भरविता आल्या नाहीत. उत्तमातील उत्तम खेळाडु आपल्या राज्यामध्ये आहेत. परंतु त्यांना संधी देता येत नव्हती. आता परिस्थिती बदलेली आहे. आता त्या दोन वर्षाचा बॅकलॉक भरुन काढावयाचा आहे.

राज्यात आयपीएलप्रो-कब्बडी स्पर्धांच्या धर्तीवर राज्यातही व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. राज्यातील खेळाडुना विविध सवलतीही देण्यात येत आहे. राज्यातील सर्व खेळाडूंच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे.