जगण्याचं बळ देतात हे सर्वोत्तम मराठी सुविचार

WhatsApp Group

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार Marathi Suvichar 100 % आचरणात आणायला हवं. माणूस वाईट गोष्ट विसरायला जास्त वेळ लावतो, पण तीच गोष्ट शिकायला काही मिनिटे सुद्धा पुरेशी होतात, म्हणून आपल्या पाल्याला चांगल्या, योग्य गोष्टी शिकविण्यावर जास्त भर द्या, म्हणजे वाईट गोष्ट शिकायला त्याला वेळच मिळणार नाही…. 

1 अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
2 आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
3 आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
4 असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
5 असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो.
6 इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
7 उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो.
8 कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
9 कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
10 कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.

माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही.

 

11 कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
12 कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.
13 कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
14 खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
15 खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.
16 घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
17 गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.
18 घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
19 घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे.
20 चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

सुविचार हे आत्म-सुधारणेसाठी शक्तिशाली साधने आहेत. ते आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देतात.

 

21 जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
22 ज्योतीचं महत्त्व आणि पावित्र्य हे अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत.
23 जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
24 जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं ? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून !
25 ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
26 झऱ्याचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात. वाईट सवयींचेही असेच होते.
27 जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो.
28 ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.
29 तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
30 थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !

सुविचार आपल्या स्वप्नांवर आणि आकांक्षांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून देखील कार्य करतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत.तो कधीही एकटा नसतो.

 

31 दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
32 दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
33 ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
34 नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
35 नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.
36 नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.
37 प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
38 पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो.
39 कलेची पारंबी माणसाला बळ देते.
40 फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.