
India vs Australia: मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत 209 धावांचे मोठे लक्ष्य 6 गडी गमावून पूर्ण केले. भारताच्या या दणदणीत पराभवाची प्रमुख कारणे कोणती होती ते जाणून घेऊया.
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भुवनेश्वर कुमारला 19 वे षटक देताना भारतीय संघाला मोठी किंमत मोजावी लागली. आशिया चषकानंतर भुवनेश्वर कुमारने भारतासाठी महत्त्वाचे 19 वे षटक टाकायला आला. मात्र, हे षटक भुवीला चांगलेच महागात पडले आणि त्याने या षटकात 16 धावा देऊन सामना जवळपास संपवला. त्याचवेळी त्याने या सामन्यात 4 षटकात 52 धावा दिल्या.
मोहालीत भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण. विशेष सामन्याच्या महत्त्वाच्या प्रसंगी संघाने हा झेल सोडला. त्याचा फटका संघाला पराभवाने चुकवावा लागला. अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनी आज भारताचा एक सोपा झेल सोडला. भारताच्या या खराब क्षेत्ररक्षणामुळे हा सामना गमवावा लागला.
Australia complete a terrific run chase in Mohali to go 1-0 up in the series 👏🏻#INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/Afs4NOJP1W pic.twitter.com/5ijuFzoZJF
— ICC (@ICC) September 20, 2022
भुवनेश्वर कुमारप्रमाणेच भारताचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलही या सामन्यात दंग दिसला. त्याने 3.2 षटकात 42 धावा देऊन एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असताना सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याला विकेट मिळाली.
कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये 21 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 45 धावांची तुफानी खेळी केली. भारतीय गोलंदाजांपैकी एकही गोलंदाज वेडला अडचणीत आणू शकला नाही, ज्याची किंमत संघाला पराभवाच्या रूपाने चुकवावी लागली.