धक्कादायक; राज्यात रोज 23 नवजात बालकांचा मृत्यू

WhatsApp Group

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात किमान 4,872 अर्भकांचा मृत्यू झाला आणि हा आकडा दररोज सरासरी 23 मृत्यू आहे. ते म्हणाले की, 4,872 अर्भकांपैकी 795 (16 टक्के) श्‍वसनाच्या आजारांमुळे मरण पावले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुंबई, ठाणे, सोलापूर, अकोला आणि नंदुरबारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. शिक्षणमंत्र्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास, पत्नीलाही ठोठावला दंड

मंत्री तानाजी सावंत, ‘महाराष्ट्रात या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 4,872 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या बाळांचे वय 0 ते 28 दिवसांच्या दरम्यान होते. मृत्यूची आकडेवारी पाहिली तर दररोज सरासरी 23 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात 52 विशेष नवजात शिशु काळजी कक्ष कार्यरत आहेत. मंत्री म्हणाले, ‘सर्व आजारी अर्भकांना सरकारी रुग्णालयात मोफत औषधे, चाचण्या आणि वाहतूक मोफत मिळते.’ Coronavirus Cases Today: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 358 नवीन रुग्ण