
मुंबई : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. मुंबईच्या उत्तर उपनगरातील पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. 9 ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी राऊत आठ दिवस ईडीच्या कोठडीत होते, ईडीने त्यांच्या पुढील कोठडीत चौकशीची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
Chawl land scam case: Judicial custody of Sanjay Raut extended till Sept 5
Read @ANI Story | https://t.co/uyDrVPwsl8#SanjayRaut #chawllandscamcase #pmla pic.twitter.com/F6cdh6GKxK
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2022
कांदिवलीतील पत्रा चाळच्या पुनर्विकास प्रकल्पातून सहआरोपी प्रवीण राऊत याच्याकडून गुन्ह्याची रक्कम मिळाल्याप्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली होती. ईडीने सुरुवातीला दावा केला होता की राऊत यांच्या कुटुंबाला ‘थेट लाभार्थी’ म्हणून 1.06 कोटी रुपये मिळाले होते. राऊत यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीने राऊत यांच्या पत्नी वर्षा यांचीही त्यांच्या कार्यालयात चौकशी केली.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
शिवसेना नेते संजय राऊत पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळा 2007 मध्ये सुरू झाला. हा घोटाळा प्रवीण राऊत, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसह महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या संगनमताने करण्यात आल्याचा आरोप आहे. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. यामध्ये 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचा मित्र प्रवीण राऊत आरोपी आहे. बांधकाम कंपनीने चाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही कंपनी प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. पत्रा चाळमध्ये तीन हजार फ्लॅट बांधले जाणार होते. चाळीतील रहिवाशांना 672 फ्लॅट मिळणार होते. खासगी बिल्डरांना जमीन विकल्याचा आरोप आहे.