“भाजपने प्रभू श्रीरामाचे अपहरण केले”, संजय राऊत अयोध्येच्या निमंत्रणाच्या प्रश्नावर संतापले

WhatsApp Group

राम मंदिराच्या उद्घाटनावरून राजकारण सुरूच आहे. आता उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून भाजपचा कार्यक्रम असल्याचं म्हटलं आहे. भाजपचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. देशभरातील विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण पाठवले जात आहे, तुम्हालाही निमंत्रित केले आहे का?, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत संतापले म्हणाले – 22 जानेवारीचा कार्यक्रम हा भाजपचा कार्यक्रम आहे.

अयोध्येच्या निमंत्रणाबाबत संजय राऊत म्हणाले की, हा मंदिर प्रशासनाचा कार्यक्रम असता तर राम मंदिराचा सोहळा वेगळा झाला असता. तिथे भाजपची सत्ता आहे. मला असे वाटते की भाजपकडूण भगवान श्रीरामांचे एक प्रकारे अपहरण झाले आहे. भाजपचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहोत.

संजय राऊत पुढे म्हणाले की, भगवान रामावर जे राजकारण केले जात आहे. ही निवडणूक घोषणा आहे. भाजपच्या कार्यक्रमाला कोण जाणार? अयोध्येत जो कार्यक्रम होत आहे तो भाजपचा कार्यक्रम आहे. एवढचं असतं  तर साऱ्या देशाला तिथे निमंत्रित केले असते, पण एनडीएचे लोक कोण आणि चमचे कोण हे भाजप पाहत आहे.

राऊत म्हणाले की, भगवान श्रीराम सर्वांचे आहेत. मी योग्य वेळी तिथे जाईन. ज्यांनी अयोध्येच्या लढ्यात चार आणेही योगदान दिले नाही ते संसदेचे उद्घाटन आणि मंदिराचे उद्घाटन करत आहेत.