
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022 च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा (Mumbai) सामना उत्तराखंडशी (Uttrakhand) झाला. या सामन्यामध्ये मुंबईने 725 धावांनी मोठा विजय मिळवत नवा विश्वविक्रम नोंदवला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) आतापर्यंत कोणत्याही संघाने एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवला नव्हता. यासह पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत जागा निश्चित केली आहे.
Mumbai Won by 725 Run(s) (Qualified) #MUMvCAU #RanjiTrophy #QF2 Scorecard:https://t.co/9IGODqlOPD
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 9, 2022
रणजी ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने उत्तराखंडचा 725 धावांच्या फरकाने धुव्वा उडवला. या विजयासह मुंबईने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक फरकाने विजय नोंदवला. 1929-30 च्या मोसमात न्यू साउथ वेल्सचा क्वीन्सलँडवर 685 धावांचा विजय हा यापूर्वीचा मोठा विजय होता. तसेच रणजीत बंगालने 1953-54 मध्ये ओरिसाचा 540 धावांनी पराभव केला होता.