
बिहारमधील वैशाली येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या अनियंत्रित ट्रकच्या चालकाने अनेकांना तुडवले. गावात मेजवानी आटोपून सर्व लोक रस्त्याच्या कडेला झुंडीने घरी परतत होते. दरम्यान, ट्रक चालकाने त्यांना चिरडले. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडाही वाढू शकतो. मृतांच्या संख्येबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. मेजवानी खाण्यासाठी काही मुलेही नातेवाईकांसह गेली होती. ही घटना वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपूर गावातील आहे. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर हाजीपूर सदर रुग्णालयातून एक शववाहिका आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आली.
या भीषण अपघातात ट्रकचा चालक स्टेअरिंगमध्ये अडकला. तोही गंभीर जखमी झाला. घटनेनंतर ट्रक झाडावर जाऊन आदळला. गावात नवतान पूजा होती. त्या पूजेला लोक मुलांसह गेले होते. तेथे जेवण करून ते परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेस आमदार प्रतिमा दास घटनास्थळी पोहोचल्या. या घटनेवर शोक व्यक्त करताना त्या म्हणाल्या की लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आता आम्ही सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. डीएम आणि एसपीही येणार आहेत. या भीषण अपघातानंतर अनेक मृतदेह रस्त्यावर विखुरले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. मृतांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली होती. स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. जखमींसोबतच बाकीचे मृतदेहही सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
The accident in Vaishali, Bihar is saddening. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 20, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बिहारमधील वैशाली येथे झालेला अपघात दुःखद आहे. पीएमएनआरएफकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. यासोबतच जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.