ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीकडून अटक, शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कारवाई

WhatsApp Group

ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली आहे. शिक्षक भरती प्रकरणासंदर्भात छापे टाकून चौकशी केल्यानंतर चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने त्याच्या जवळच्या मित्रांकडून करोडो रुपयांची रोकड आणि सोने जप्त केली आहे. शुक्रवार 22 जुलै रोजी ईडीने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतरही हा छापा सुरूच आहे. पार्थ चॅटर्जी यांचा जवळच्या सहकारी अर्पिता यांच्या घरातून ईडीने 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली होती. ईडीने अर्पितालाही ताब्यात घेतले आहे.

गेल्या अनेक तासांपासून ममता बॅनर्जी यांचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरू होती, यादरम्यान ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले, ज्यांचे मंत्री उत्तर देऊ शकले नाहीत. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

काय आहे शिक्षक भरती घोटाळा?

पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्र्यांवर करण्यात येत असलेली ही संपूर्ण कारवाई शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये नापास उमेदवार लाखो रुपयांची लाच घेऊन उत्तीर्ण झाले. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक केली जाईल.

ममता यांचे आणखी एक मंत्री परेश अधिकारी यांच्या घरावर ईडी छापे टाकत आहे. यासोबतच त्याच्या जवळच्या मित्रांचीही चौकशी केली जात आहे. याशिवाय नोकरभरती घोटाळ्याशी संबंधित अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे.