जळगावात १५०० किलो गांजा जप्त, मुंबई NCB ची धडक कारवाई!

WhatsApp Group

महाराष्ट्र – मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ तब्बल १५०० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला गेला असल्याचं समोर आलं आहे.


NCB ने केलेल्या या कारवाईत हा १५०० किलो विशाखापट्टणममधून जळगावमध्ये एका ट्रकमधून आणण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. तसेच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे आंध्र प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती NCB ने दिली आहे.