Himachal Pardesh Accident: हिमाचल प्रदेशात मोठा अपघात: प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवर दरड कोसळली, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. एका बसवर दरड कोसळून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बल्लू पुलाजवळ हा अपघात झाला. डोंगरकिनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड कोसळून एका खाजगी बसवर कोसळले. बस ढिगाऱ्याखाली गाडली गेली, ज्यामुळे प्रवासी आत अडकले. सुरुवातीच्या वृत्तानुसार, बसमध्ये ३० जण होते. बार्थिनजवळ अचानक झालेल्या भूस्खलनामुळे बसवर ढिगारा पडला आणि ती वेढली गेली. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बिलासपूरचे जिल्हा दंडाधिकारी राहुल कुमार यांनी सांगितले की, बिलासपूर भूस्खलनात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि तिघांना जिवंत वाचवण्यात आले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल.
पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. “हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मला दुःख झाले आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना ₹२ लाखांची मदत दिली जाईल. जखमींना ५०,००० रुपये देण्यात येतील.” असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलंय. राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला आहे.