स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 27% उमेदवार ओबीसी समाजाचे, जयंत पाटील यांनी दिली माहिती

WhatsApp Group

मुंबई – ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार हे ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू. असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.