आशिया चषकासाठी निवड न झाल्याने Ishan Kishanची पहिली प्रतिक्रिया

WhatsApp Group

आशिया चषक 2022 साठी भारतीय संघात स्थान मिळवू न शकल्यानंतर इशान किशनची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईशानने इन्स्टाग्राम स्टोरीवर गाण्यासोबतचा त्याचा फोटो शेअर केला आहे. या गाण्याच्या ओळींवरून त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. इशान किशनने 2022 मध्ये मिळालेल्या संधींमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु असे असूनही तो आशिया चषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकला नाही. असे मानले जाते की आशिया चषकातील बहुतेक खेळाडूंना टी-20 विश्वचषक 2022 च्या संघात स्थान आहे, आता टी-20 विश्वचषक 2022 चे दरवाजे देखील इशान किशनसाठी बंद होताना दिसत आहेत.

इशानने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 14 सामन्यांमध्ये 30.71 च्या सरासरीने आणि 130.30 च्या स्ट्राइक रेटने एकूण 430 धावा केल्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने संघात आपले स्थान पक्के केले होते. त्याचा बॅकअप सलामीवीर आणि यष्टिरक्षक म्हणून वापर केला जात होता, परंतु आशिया कपसाठी केएल राहुलच्या पुनरागमनामुळे इशानला वगळण्यात आले.

ईशानने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, अब ऐसा बनना नहीं, भले घायल हो जाना, तुझे फूल समझे कोई तो तू फायर हो जाना, इन सब आगे वालों की तरह न गयाब हो जाना.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत इशानच्या बॅटने खूप धावा केल्या होत्या. त्याने दिल्लीत 76, कटकमध्ये 36, विशाखापट्टणममध्ये 54, राजकोटमध्ये 27 आणि बंगळुरूमध्ये 15 धावा केल्या. मात्र, त्यानंतर त्याची बॅट आयर्लंड, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध चालली नाही.  विंडीजविरुद्धच्या 5व्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात त्याला केवळ 11 धावाच करता आल्या. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने 8 धावा केल्या होत्या. इशानला इंग्लंड आणि विंडीजविरुद्ध एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.