
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. मंगळवार-बुधवार रात्री उशिरा भारताने पाकिस्तानवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. पाकिस्तान तसेच पीओकेमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. भारताने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईकही केल्याचे मानले जाते. यामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू ने ट्वीट किया, “#OperationSindoor“
(वीडियो सोर्स: किरेन रिजिजू/X) pic.twitter.com/nkCZ9zz85Y
— ANI_HindiNews (@AHindinews) May 6, 2025
नियंत्रण रेषेवरून एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनीही एक निवेदन जारी केले आहे. “आम्हाला अहवालांची माहिती आहे. तथापि, सध्या आमच्याकडे कोणतेही मूल्यांकन नाही. ही एक बदलणारी परिस्थिती आहे आणि आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत,” असे ते म्हणाले.
#WATCH | Poonch, Jammu and Kashmir: Visuals from Line of Control (LoC) as the Indian Armed Forces launched ‘Operation Sindoor’, hitting terrorist infrastructure in Pakistan and Pakistan-occupied Jammu and Kashmir from where terrorist attacks against India have been planned and… pic.twitter.com/A7DG8dRZ6v
— ANI (@ANI) May 6, 2025
पाकिस्तानी चौक्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने X वर पोस्ट केले आहे. एका ट्विटमध्ये, भारतीय सैन्याने लिहिले आहे की, “पुंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर गलीमध्ये तोफखान्यांसह गोळीबार करून पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे.” दुसऱ्या ट्विटमध्ये व्हिडिओ शेअर करताना भारतीय लष्कराने लिहिले की, “प्रहारय सन्निहिता, जयये प्रशिक्षणाह.”
Bahawalpur, Pakistan pic.twitter.com/3kWDqHL3DK
— Mossad Commentary (@MOSSADil) May 6, 2025
भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कराच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढवला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.