
Ind Vs Aus 2nd T20 : नागपुर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमान संघाने शेवटच्या षटकात चार विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावा केल्या. 20 चेंडूंच्या झंझावाती खेळीत हिटमॅनने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार मारून टीम इंडियाला चार चेंडू आधीच विजय मिळवून दिला.
Captain @ImRo45‘s reaction ☺️
Crowd’s joy 👏@DineshKarthik‘s grin 👍
🎥 Relive the mood as #TeamIndia sealed a series-levelling win in Nagpur 🔽 #INDvAUS | @mastercardindia
Scorecard ▶️ https://t.co/LyNJTtl5L3 pic.twitter.com/bkiJmUCSeu
— BCCI (@BCCI) September 23, 2022
8 षटकांत 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. पहिल्याच षटकात तीन षटकार मारले गेले. जोश हेझलवूडच्या या षटकात रोहितने दोन षटकार आणि केएल राहुलने एक षटकार लगावला. यानंतर दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या. भारताची पहिली विकेट तिसऱ्या षटकात पडली. केएल राहुल सहा चेंडूत 10 धावा करून बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतरही रोहित थांबला नाही आणि मोठे फटके खेळत राहिला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहलीनेही दोन चौकार मारून आपले इरादे सिद्ध केले. पण पाचव्या षटकात लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सलग दोन चेंडूंवर कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना बाद करून सामन्यात पुनरागमन केले.
पण रोहित थांबला नाही आणि सर्व गोलंदाजांवर मोठे फटके खेळत राहिला. हार्दिक पांड्या सातव्या षटकात बाद झाला. त्याने 9 धावा केल्या. शेवटच्या षटकात भारताला 9 धावा करायच्या होत्या. दिनेश कार्तिकने आधी षटकार आणि नंतर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्याने दोन चेंडूंत नाबाद 10 धावा केल्या. त्याचवेळी रोहितने 20 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 46 धावांची खेळी केली.
मॅथ्यू वेडच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 90 धावा केल्या होत्या. भारताकडून गोलंदाजीमध्ये अक्षर पटेलने अप्रतिम गोलंदाजी करत दोन षटकात केवळ 12 धावा देत 2 बळी घेतले.