दुर्दैवी! बीडमध्ये एकाच दिवशी चार शेतकऱ्यांची आत्महत्या

WhatsApp Group

बीड – बीड (Beed) जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्याचं धक्कादायक आणि विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये तीन शेतकऱ्यांनी (Farmer) गळफास घेऊन आत्महत्या केली, तर एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं आहे.

चंद्रकांत भारत जाधव वय २८ रा. उमरद खालसा ता.बीड, या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तर दुसरी आत्महत्येची घटना बीड तालुक्यातीलच मुर्शदपूर या ठिकाणी घडली आहे. येथील परशुराम तुकाराम जगताप वय ३८ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसरी घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही या ठिकाणी घडली. भीमा बाबू काटमोरे यांनी विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्यांना उपचारार्थ रुग्णालयामध्ये (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर चौथी घटना माजलगाव तालुक्यामध्ये घडली. रमेश नागुराव कोंबडे वय ३० या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या चारही आत्महत्या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली असून, आत्महत्या का केली ? याचा पुढील तपास पोलिस करत आहेत.