
प्रयागराज – महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आयआयटी बाबांनी स्वतः इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत हा संपूर्ण प्रकार उघड केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आयआयटी बाबा नोएडामधील एका खासगी वृत्तवाहिनीच्या डिबेट कार्यक्रमात सहभागी झाले होते. या चर्चासत्रादरम्यान त्यांच्या सोबत गैरवर्तन झाले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर बाबांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन सुरू केले.
“Shocking incident at News Nation! During an interview, Abhey Singh was suddenly attacked by monks and news reporters who abused him on live. Chaos erupted as the situation escalated. More details to follow. #abheysingh #NewsNationAttack” pic.twitter.com/tRmD0Ibzol
— Jugaram Haswalth (@Sternritter_B09) February 28, 2025
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आयआयटीयन बाबा अभय सिंग सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. त्याने सामन्यापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती.
This is completely unacceptable. It clearly exposes the true face of those in power. In today’s world, it is extremely difficult for an honest and truthful person to survive. Anyone who dares to expose evil is silenced.
I urge Abhay Singh to reject all interview invitations pic.twitter.com/wu1FFR9DL7— ਪੱਕੇ Australia ਵਾਲੇ (@PakkeAU) February 28, 2025
भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यापूर्वी आयआयटीयन बाबांनी एक मोठी भविष्यवाणी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागेल, असे त्यांनी म्हटले होते. कोहली कितीही ताकद लाऊदेत, भारत कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकणार नाही असा दावा आयआयटी बाबाने केला होता.
#boycottnewsnation 😡 #IITianBaba #IITbaba #AbheySingh
जी को इन लोगों ने पीड़ित किया है
Lock किया था news room में
जबरदस्ती भी की pic.twitter.com/Z10P0e69Pr— विद्या एम (@Vidyams1311) February 28, 2025
पण भारत-पाकिस्तान सामन्या बाबतचा आयआयटीयन बाबाचा अंदाज चुकला. भारताने हा सामना जिंकला आणि विराट कोहलीनेही या सामन्यात एक दमदार शतकही झळकावले. आता भारतीय संघाच्या विजयानंतर बाबाला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे. आता मारहाणीीची घटना समोर आलीय.