![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ पाचव्यांदा विजेतेपद पटकावणार आहे, तर गेल्या मोसमातील विजेते गुजरात टायटन्स संघ विजेतेपद वाचवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. अहमदाबादमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला, त्यामुळे सामना अर्धा तास उशिराने सुरू झाला. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, पावसामुळे सामना रद्द झाला, तर अशावेळी कोणता संघ विजेता घोषित होणार?
बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही, त्यामुळे सामन्याचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल. बीसीसीआयच्या नियमांनुसार अंतिम सामन्यात पावसामुळे संपूर्ण सामना खेळला गेला नाही तर किमान पाच षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. जर पाच षटकांचा सामनाही होण्याची शक्यता नसेल, तर त्यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये येऊ शकतो. अंतिम सामन्यासाठी सुपरओव्हरची शेवटची नियोजित वेळ सकाळी 1.20 आहे.
पावसामुळे सुपरओव्हर खेळण्याची शक्यता नसल्यास आणि निकाल न लागल्यास, अशा परिस्थितीत, 70 सामन्यांनंतर, साखळी टप्प्यातील गटातील अव्वल संघाला विजेता घोषित केले जाईल. गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून ग्रुप स्टेजचा शेवट केला, याशिवाय, IPL 2023 च्या पहिल्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. अशा स्थितीत पावसामुळे खेळ झाला नाही, तर गुजरात टायटन्सचे विजेतेपद कायम राहील.
अहमदाबादचे हवामान कसे आहे?
अहमदाबादमध्ये रविवारी तापमान 39 अंश राहण्याचा अंदाज आहे, दुपारी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, जरी संध्याकाळी हवामानाच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सामन्यात फारसा धोका नाही.