
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरू आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशात राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही देण्यात आली आहे.
838 houses damaged & 4916 people have been shifted to safer locations, 35 relief camps set up by the disaster mgmt dept and rehabilitation department. 125 animals also lost their lives in rain/flood-related incidents in Maharashtra since June 1, 2022: State Disaster Mgmt Dept
— ANI (@ANI) July 10, 2022
यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे राज्यात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. पूरग्रस्तांसाठी राज्यामध्ये 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.