Maharashtra Monsoon Updates : मान्सून कुठे गायब झाला? राज्यात पावसाऐवजी उष्णतेची लाट

WhatsApp Group

Maharashtra Monsoon Updates : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्याने अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे तब्बल तीन दिवसांपासून मान्सून (Monsoon) कर्नाटकमधील (Karnataka) कारवारमध्येच रेंगाळला आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत तापमान सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील बहुतांश नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या चटक्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

राज्यात मान्सूनच्या पावसाऐवजी सध्या उष्णतेचा प्रकोप (Heat Wave) बघायला मिळत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.

काल विदर्भात (Vidarbha Heat Wave) उच्चांकी तापमानाची नोंद भारतीय हवामान विभागाने केली. शिवाय आगामी दोन दिवसासाठी विदर्भात उष्णतेचा येल्लो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.