हाथरसपाठोपाठ अलीगडमध्येही भीषण अपघात; रोडवेज बसची कारला धडक, 5 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

उत्तर प्रदेशातील हाथरसनंतर अलीगढमध्येही भीषण अपघात झाला. रोडवेजच्या बसने कारला जोरदार धडक दिली, त्यात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये कारमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मात्र, अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

अलीगडमधील खैर पोलीस स्टेशन हद्दीतील आंदला गावाजवळ हा अपघात झाला. कार अलीगढहून टप्पलच्या दिशेने जात होती आणि समोरून रोडवेजची बस येत होती. यादरम्यान दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन कारचे चक्काचूर झाले. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. तर, पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर सर्वांना रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.