सेना – भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना – भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक असल्याची प्रतिक्रिया आज (19 सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना – भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक असल्याचं उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचं प्रतिपादन.@DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #Grampanchayat #ग्रामपंचायत pic.twitter.com/PKGAtUoUBw
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 19, 2022
राज्यात 550 पैकी 300 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक आलेले उमेदवार हे शिंदे गटाच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि भाजपाचे आहेत. दरम्यान राज्यात निवडणूक आलेल्या उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटापेक्षा शिंदे गटाचा आकडा जास्त आहे.