शाळेच्या जेवणात सापडली मृत पाल, 100 हून अधिक मुले झाली आजारी

WhatsApp Group

झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडमधील पाकूर येथील एका खासगी शाळेत मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणात मृत पाल सापडल्याची घटना समोर आली आहे. हे अन्न खाल्ल्यानंतर 100 हून अधिक मुले आजारी पडली आणि त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकूरच्या पकुडिया ब्लॉकमध्ये असलेल्या एका खाजगी शाळेत पाल पडल्याने आणि तेच अन्न खाल्ल्याने 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडले. सर्व मुलांना उलट्या आणि डोकेदुखी सुरू झाली.

यानंतर 60 हून अधिक मुलांना तात्काळ पश्चिम बंगालमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. 40 हून अधिक मुलांना स्थानिक सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याबाबत प्रशासनालाही कळविण्यात आले. सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.