सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ हळूहळू भारताकडे सरकत आहे. त्यात चार राज्ये येऊ शकतात. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठा धोका गुजरातला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातही होण्याची भीती आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करू शकते, असे सांगण्यात येत आहे. गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या 11 पथकांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
Very severe cyclonic storm Biparjoy over eastcentral Arabian Sea at 2330 hours IST of 08th June, 2023 over about 840 km west-southwest of Goa, 870 km west-southwest of Mumbai. To intensify further gradually during next 36 hours and move nearly north-northwestwards in next 2 days. pic.twitter.com/dx6b3VAEN6
— India Meteorological Department (@Indiametdept) June 8, 2023
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांना खोल समुद्रातून परतण्यास सांगण्यात आले आहे. हे चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह शिडकावा होण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ पोरबंदरच्या नैऋत्येला ९३० किमी अंतरावर आहे. हवामान खात्यानुसार, या वादळामुळे ताशी 135 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. ज्याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो.
अहमदाबादमधील हवामान विभागाच्या विज्ञान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंते यांनी हिंदुस्थानला सांगितले की, “या चक्रीवादळामुळे 10, 11 आणि 12 जून रोजी वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 नॉट्स वेगाने वाहू शकतो. वाऱ्याचा वेगही 65 नॉट्सपर्यंत जाऊ शकतो. चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस पडू शकतो. याबाबत सर्व बंदरांना कळविण्यात आले आहे. त्यांना चेतावणी संदेश जारी करण्यास सांगितले आहे.”