
पठाण चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते राम कदम यांनी म्हटले आहे. हिंदुत्वाचा अपमान करणारा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला जाणार नाही, असे ते म्हणाले. या विषयावर मौन न बाळगता आपली भूमिका स्पष्ट करणे ही निर्मात्यांची नैतिक जबाबदारी नाही का, असा सवालही राम कदम यांनी चित्रपट निर्मात्यांना केला आहे.
राम कदम म्हणाले की, महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या आदर्शावर चालणारे भाजपचे सरकार असल्याने हिंदुत्वाच्या भावनांचा अवमान करणारा कोणताही चित्रपट सरकार चालवू देणार नाही.
#पठाण फिल्मला देशभरातील #साधू #संत #महात्मा सहित social media वर देखीलअनेक #हिंदू संघटना आणी करोडो लोक ह्या चित्रपटाला विरोध करत आहेत.
महाराष्ट्रात सध्या #हिंदुत्व विचारधारा असणारे सरकार आहे
अधिक बरे राहील फिल्म निर्माता आणी दिग्दर्शक समोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका
— Ram Kadam (@ramkadam) December 16, 2022
काय आहे पठाण चित्रपट वाद
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या पहिल्या गाण्यात दीपिकाच्या पोशाखाच्या रंगावर आक्षेप घेण्यात आला आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बुधवारी एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी बॉलिवूड चित्रपट ‘पठाण’ आणि त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्याला विरोध केला. एका संघटनेने मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पठाण चित्रपटाच्या निषेधार्थ शाहरुख खानचा पुतळा जाळला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल त्यावर बंदी घालण्याची मागणी केली.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही घेतला आक्षेप
याआधी नरोत्तम मिश्रा यांनी पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दाखवण्यात आलेल्या दृश्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि चित्रपटातील गाण्यातील वेशभूषा प्रथमदर्शनी अतिशय आक्षेपार्ह असल्याचे म्हटले होते. गाण्यातील दृश्ये आणि वेशभूषा दुरुस्त करावी, अन्यथा मध्य प्रदेशात चित्रपटाला परवानगी द्यायची की नाही, हा विचाराचा विषय आहे.नरोत्तम मिश्रा यांच्या या विधानानंतर चित्रपटावर बंदीही येऊ शकते.