
Bharat Jodo Yatra In Maharashtra: देगलूर येथील भारत जोडो पदयात्रेदरम्यान अखिल भारतीय सेवा दल काँग्रेसचे नागपूरचे अध्यक्ष कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राहुल गांधी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस कृष्णकांत पांडेजी यांचे निधन संपूर्ण काँग्रेस परिवारासाठी दु:खद आहे. त्यांच्या प्रियजनांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. आज प्रवासादरम्यान त्यांनी शेवटच्या क्षणी तिरंगा हातात धरला. त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.
कांग्रेस सेवा दल के महासचिव, कृष्णकांत पांडे जी का निधन पूरे कांग्रेस परिवार के लिए बहुत दुःखद है। उनके प्रियजनों को मैं अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
आज, यात्रा के दौरान अंतिम समय में उन्होंने हाथों में तिरंगा थामा था। देश के लिए उनका समर्पण हमें सदा प्रेरणा देता रहेगा। pic.twitter.com/VvC1O5ZJfh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2022
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, भारत जोडो यात्रेदरम्यान सेवा दलाचे सरचिटणीस कृष्णकुमार पांडे राष्ट्रध्वज हातात घेऊन माझ्यासोबत चालत होते. काही मिनिटांनी त्यांनी झेंडा एका सहकाऱ्याकडे देऊन पते रत गेले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळळे त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते कट्टर काँग्रेसी असल्याचे काँग्रेस खासदार म्हणाले.
This 62nd morning of Bharat Jodo Yatra, Krishna Kumar Pandey, General Secretary of Seva Dal was holding the national flag and walking with @digvijaya_28 & me. After a few minutes, as is the practice, he handed the flag to a colleague and moved back. Thereafter he collapsed… pic.twitter.com/5rMiCAfu6P
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) November 8, 2022
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील गुरुद्वार येथे प्रार्थना केल्यानंतर पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’ला सुरुवात केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज 62 वा दिवस आहे. सोमवारी रात्री तेलंगणातून यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मंगळवारी सकाळी काँग्रेस खासदारांनी गुरुद्वारा यादरी बाबा जोरावर सिंगजी फतेहसिंहजी येथे गुरु नानक जयंतीनिमित्त प्रार्थना केली. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यात राज्यातील जनतेच्या समस्या ऐकून घेणार असल्याचे सांगितले. सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या या पदयात्रेची सांगता श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावून होईल, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.