उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के; ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार

WhatsApp Group

मुंबई – उद्धव ठाकेंच्या हातातून राज्याची सत्ता गेली, यानंतर आता ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं आहे. आता तर त्यांना आपला गड वाचवणं कठीण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसातच आता ठाणेदेखील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातातून निसटताना दिसत आहे. महानगरपालिकेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि त्यांनी याबाबत घोषणा केली.

ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत देखील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नवी मुंबईतील 30 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. विजय चौगुले यांच्यामाध्यमातून शिंदे गटाला पाठिंबा देण्यात आला आहे. आज रात्री 9 वा नंदनवन बंगल्यावर हे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे 50 नगरसेवक आहेत. त्यामधील 30 ते 32 जण एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. आगामी काळात उर्वरित नगरसेवकांना देखील गळाला लावण्याचं काम शिंदे गटाकडून होणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिनसेनेसाठी हा आणखी मोठा धक्का आहे.