
रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजनारी पुलावरुन एलपीजी टँकर उलटल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दूर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत झाली आहे. टँकरमधील एलपीजी वायू सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्याजवळ अंजनारी पुलावरुन एलपीजी टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. pic.twitter.com/oTYvTjowb1
— Inside Marathi (@InsideMarathi) September 23, 2022
हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.