
‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat jeev Rangla) मालिकेतीमधील राणा दा आणि पाठकबाईंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्दिक जोशी (hardeek joshi) आणि अक्षया देवधरचा (Akshaya Deodhar) नुकताच साखरपुडा पार पडला आहे.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी राणा दा आणि अंजलीबाईंसाठीचं प्रेक्षकांचे प्रेम कमी झालेलं नाही. आता प्रेक्षक त्यांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावामधील शाळेत शिक्षिका असलेल्या अंजली बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. आता वैयक्तिक आयुष्यामध्ये ते सार फेरे घेणार असल्यामुळे चाहते आनंदीत झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोवर चाहते आणि कलाकार अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.