वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त प्रवाशांनी टीसला शौचालयात केले बंद

WhatsApp Group

वीजपुरवठा खंडित झाल्याने बराच वेळ ट्रेन एकाच जागी उभी होती. मात्र यामुळे प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी थेट टीसीलाच धारेवर धरले. भारतीय रेल्वेतील रेल्वे प्रवास हा केवळ प्रवास नसून आयुष्यभर स्मरणात राहणारा अनुभव आहे. या प्रवासात कधी कधी आंबट गोड अनुभव येतात. शुक्रवारी आनंद विहार ते गाझीपूर या सुहेलदेव ट्रेनमध्ये चढलेल्या प्रवाशांसाठी हा अनुभव कडूच होता.दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशच्या गाझीपूरकडे जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस तिच्या नियमित वेळेनुसार आनंद विहारहून निघाली.

मात्र गाडी पुढे सरकली असता ट्रेनच्या दोन बोगींमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे एसीही बंद पडला आणि उन्हामुळे लोकांची चीड आणि संताप आणखीनच वाढला. वाढत्या उन्हामुळे बोगीतून प्रवास करणाऱ्या लहान मुले व महिलांच्या अडचणी वाढल्या. ट्रेनच्या तिकीट तपासनीस (टीटीई) ला पाहिल्यावर B1 आणि B2 डब्यातील प्रवाशांना उन्हामुळे त्रास झाला. मग काय सगळा राग त्याच्यावर निघाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी तिकीट तपासनीस शौचालयात बंद केले.

प्रकरण वाढल्याने रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिस दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा ही परिस्थिती वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेत तात्काळ दोन रेल्वे डब्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले.

पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ट्रेन तुंडला रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा इंजिनीअर्सच्या पथकाने ट्रेनच्या डब्यात वीज खंडित होण्याचे कारण शोधण्यास सुरुवात केली. काही वेळाने बी 1 कोचमधील वीज खंडित होण्याची समस्या दूर झाली. यानंतर, बी2 कोचमध्येही वीज पूर्ववत झाली आणि ट्रेन पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली.

सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमधील हा बिघाड आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांबाबत ट्रेनमधील प्रवाशांनी ट्विट केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रेन 2 तासांहून अधिक वेळ तुंडला रेल्वे स्थानकावर उभी होती. आधीच उशिराने धावणारी ट्रेन वीज खंडित झाल्यामुळे आणखी उशीर झाली. ही ट्रेन जवळपास 5 तास उशिराने गेली.