मृत व्यक्ती झाला जिवंत; नेमकी घटना काय? जाणून घ्या

WhatsApp Group

उत्तर प्रदेशातील बंदमधुनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या वृद्धाचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. अंत्यसंस्कार सुरु असतानाच चितेतून उचलून घाईघाईने कापडात गुंडाळून या वृद्ध व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शहरातील कोतवाली भागातील शंभू नगर परिसरात राहणारे वृंदावन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. कुटुंबीयांनी त्यांना मुक्तीधाम येथे नेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मृतदेहही चितेवर ठेवला होता, सर्व सुरू असतानाच अचानक त्यांचे ओठ आणि गाल हलू लागले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मोठा मुलगा सुधीर कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांना 3 दिवसांपासून ताप होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी मुक्तिधाम येथे नेण्यात आले, तेथे शरीरात हालचाल दिसून आली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.

जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनीत सचान यांनी  सांगितले की, ‘कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला की शरीराचे तापमान हळूहळू कमी होत जाते. शरीरात गॅस झाला की तो तोंडातून आणि नाकातून बाहेर पडत राहतो. त्यामुळे शरीरातील स्नायू सतत हलत राहतात. हे अनेकवेळा पाहिले आहे. गॅस बाहेर पडल्याने शरीरात हालचाल होत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला जिवंत मानले. पण त्यांचा मृत्यू झाला होता, हृदयाने काम करणे बंद केले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घेऊन जाऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.