मंत्रिमंडळ निर्णय: मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे 6 मोठे निर्णय

WhatsApp Group

शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज (12 सप्टेंबर) पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने 6 मोठे निर्णय घेतले आहेत.

आज 12 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 

  • अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार, नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण
  • नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता.
  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास मान्यता.
  • महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ.
  • केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार