रत्नागिरीत एकाच कुटुंबातील 4 जण बेपत्ता

WhatsApp Group

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील विसापूर ग्रामीण भागातील एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. दापोली पोलिसांनी तयांच्या शोधासाठी पथक नेमले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पती भरत भेलेकर त्यांची पत्नी सुगंधा भेलेकर आणि त्यांची मुलं आराध्य (वय 7) आणि श्री (वय 4) अशी बेपत्ता झालेल्यांची नावं आहेत.